कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Friday, December 31, 2010

२०११-नवी आव्हानं???

३१ डिसेंबर.
सरत्या वर्षाचा शेवट आणि इंग्लिश वर्षाची सुरुवात.२०१० हे वर्ष तसं तर मोठमोठ्या आर्थिक उलाढालीचं आणि राजकीय घोटाळ्याचं.काहीशी चांगली कामगिरी वगळता देशातील परिस्थिती एकंदरीतच असंतोषाची.सामान्य माणसावर पडणारा महागाईचा ताण आणि नेते लोकांचा मात्र "आदर्शवाद".कुणी क्रिकेटमध्ये गुंतलेले तर कुणी राष्ट्रीय खेळातील मैदानावरीलच माती खाणारे.देशाच्या रथाची दोर यांच्या हातात पण त्यांनी ती दोर आपल्या घराच्या अंगणात बांधून विदेशवारी करण्यातच निपुण्य मिळवलंय.ज्या मंडळींवर देश चालवण्याची जबाबदारी आहे तेच लोकं देशाला पोखरायला निघालेय.सामान्य माणसाला त्याचं घरंच नीट चालवता येत नाही त्यात देशाचं काय?
महागाईचा भस्मासुर एवढा वाढतोय की त्याला आवरायला पुन: भगवंताला प्रकट रुपात पृथ्वीवर यावे लागेल असे वाटते कारण ते काही या सत्ताधारी मानवांचे काम दिसत नाही.असो.जोपर्यंत राजकारणी लोकं हव्यासापोटी जगणं सोडणार नाही तोवर सामान्य माणसांचे हाल निश्चित आहे.

२०१०.व्यक्तिगतरीत्या मागे वळून पाहताना भरपूर अश्या गोष्टी किंबहुना घडामोडी आहेत ज्या पुन: आयुष्यात घडाव्यात असे काही वाटत नाही.काहीश्या गोड, काहीश्या आंबट आणि काही काही तर तुरटही अश्या गोष्टी आणि अनुभव प्रामुख्याने या सरत्या वर्षात बघायला मिळाल्या.त्याच गोष्टींच्या काही आठवणी तर काही साठवणी मनात कुठेतरी रुजून असतात.हे तर जीवनात येत-जात राहतातच पण २०१० मध्ये जरा जास्तच होत्या.

२०११.नवीन वर्ष म्हटलं की नवी आव्हानं.त्या आव्हानांना पेलण्यासाठी पुन: नव्याने बांधणी,नवी तडजोड आणि त्यातच "माझे रिझोल्युशन" हे प्रत्येकाच्याच मनात असलेलं काहीतरी गुपित असतं.मी नेहमी काहीतरी रिझोल्युशन ठरवतो पण परिस्थिती नेहमीच त्याच्या विरुद्ध असते.त्याकारणाने माझे रिझोल्युशन हे दरवर्षी मोडीतच येतं.बघूया या वर्षी काय होतं ते.

हे वर्ष निदान माझ्यासाठी तरी काही सोन्याचं नव्हतं राव.परमेश्वर करो की येणारं वर्ष माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक जीविताच्या आयुष्यात सुख-समाधानाची भरभराट घेऊन येवो.सर्व रसिक प्रेक्षकांना नव-वर्षाच्या हार्दिक शुबेच्छा...............!!!

Friday, December 3, 2010

रंगमंच

आज लेखणीतील शाई संपली आहे,

दरवेळेचं नाटक आहे.

टायपिंगचा कंटाळा आल्यावर जर काही लिहायला गेलं

तर नेमकी शाई नाही.

आता काय लिहिणार कपाळ........

मनातील जे भाव आज कागदावर उतरवायचे होते

ते मनातच राहून गेले.

पुन्हा गुंतले ते आत,आणखी आत.

कधी पुन्हा इच्छा होईल,

कधी हातात लेखणी येईल

आणि आलीच तर त्यात शाई राहणार की नाही,

हे आगाऊचे प्रश्न निर्माण झाले.

रंगमंचावर सुद्धा कधी कधी असेच होते.

शाई भरलेला कागद मनात असतो.

शाईने रंगलेल्या शब्दांना आपल्या भावनेने सजवून

प्रेक्षकांपुढे त्याचे सादरीकरण करायचे असते.

पण कधीतरी हे सादरीकरण भावनाविरहित होते

कारण मनातील शब्दांची अन त्या शाईने रंगलेल्या शब्दांची

गट्टीच जमत नाही.

मनाच्या शाईचा रंग अन शब्दांच्या शाईचे मिश्रण होत नाही.

शब्दांच्या तारेवर कसरत करणे म्हणजे रंगमंच नव्हे,

ती कसरत हजारो लोकांच्या देखत दिमाखात सादर करणे

हे खऱ्या प्रतिभावंताचे काम होय.

आज मीच रंगमंच गाजवणार,

सूर्यासारखा मीच तळपणार,

याच ध्येयाने रंगमचावर ओठांतून जणू शाईचे सडे सांडतात.

तेच सडे कुणी ओंजळीत घेत माथी लावतात

तर कुणी पायाखाली तुडवून निघून जातात.....................!!!


Sunday, November 21, 2010

भेटीचे प्रेमांतर................!!!


प्रेमात पहिल्यांदाच पडल्यावर प्रत्येकाला त्याची प्रेयसी निदान ऐश्वर्या राय पेक्षा तरी किंचित जास्तच सुंदर वाटते.तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याची वाटेल ते करण्याची तयारी असते.मग तो कधी तिची तुलना आकाशातील तारकांशी करतो तर कधी उगवत्या गुलाबाशी.तिलासुद्धा आपल्याला ह्याच्यासारखा जोडीदार लाभला याचा मनोनीत आनंद होऊ लागतो. आमच्या नायकाचे सुद्धा असेच झाले राव.........
साधारण काही दिवस प्रेमाचे लव्हाळे असेच चालू असतात.म्हणतात ना नव्याची नवलाई चार दिवस.तेच होतं.मग त्याला तिला रोज-रोज भेटणं आवडत नाही.तिच्या ड्रेस घालण्यावर तो उगाच काहीतरी कॉमेंट्स देतो.आजकाल हा आपल्याला भेटायचे टाळतो आहे हे तिच्याही लक्षात येतं.तू आता पहिलेसारखा नाही राहिलास मुळी.तिचा नाराजीचा सूर उगवतो.दोघंही नाराज होऊन निघून जातात............
पण म्हणतात ना खऱ्या प्रेमाची अनुभूती ही दूर राहिल्यानंतरच होते.मग बऱ्याच दिवसांनी भेटण्याचे ठरते.ती भेट पहिल्या भेटीहूनही अधिक रोमांचक वाटत असते.मग पुनः नव्याने भेटणे,नाराजी दूर करून राजी होणे हे फेरबदल मुख्य रूपाने होतात.आणि त्या भेटीचे रुपांतर पुनः प्रेमात होऊन जाते.
त्या भेटीच्या प्रेमांतराचा संवाद जणू कवितेच्या स्वरुपातच होतो...........


छान एका बागेत भेटण्याचे ठरले.

मी उशीरा आल्याने तिने दुरूनच पाहता

नाक मुरडले.

जीन्स,टी-शर्ट नेहमी घालणारी ती

आज चक्क सलवार घालून आली होती

बघून तिला मनात माझ्या प्रेमाची बासरी वाजत होती

अरे वा! तुमचे वाहन आज वेळेवर आले

तू कुठे गेला होतास?रागातच तिने विचारले


आल्या आल्या प्रश्न काय विचारते तूर्तास

कुठे काय? तुलाच आलो भेटण्यास

चल बसुया आत

भलताच दिसतोय
आज वेगात

तिने मुद्दाम तिची ओढणी माझ्या

डोळ्यावर भिरकावत विचारले......

तुला दिसत नाही आज काही वेगळेपण?

हो जरा जास्तच रमणीय आहे वातावरण

असा कसा रे तू अनरोमांटिक

अगं बाजूच्या बाकावर बसलेली मुलगी आहे फंटास्टिक

रागाने उठून गेली ती तरातरा

मीही तिच्या मागे गेलो भराभरा

हातात घेउनी तिचा हात

म्हणालो खूप सुंदर दिसतेय तू आज

कसला चढलाय तुझ्या रुपाला साज

बदललेला दिसतोय तुझा मिजाझ......

आवडते मला तुझे रागावणे

काहीतरी नवीन सांग हे तर रोजचेच रडगाणे

नवं काही करायला गेलं तर तुझे नेहमीचेच बहाणे

देशील का मला माझे हवे ते मागणे

काय हवं आहे तुम्हाला मि.शहाणे

मला हवे आहे तुझ्या ओठांचे तराणे

गायचेय आज तुझ्या हृदयातील गाणे

हवा आहे तुझा मखमली स्पर्श

वातावरणात बहरू दे अपुल्या भेटीचा हर्ष

लाजलाजूनी चूर होऊन ती दूर पळाली

तिच्या लाजण्याने मला नवी चाहूल मिळाली

चटकन तिच्या गालावर लाजेची खळी खुलली

रुसलेली माझी सखी प्रीतीच्या गुलाबाने पुन्हा फुलली.


Wednesday, November 17, 2010

अनुभूती




रूप तुझे मोहक जागवी मज रात-राती
लोचनास भासे तुझ्या स्पर्शाची अनुभूती

मोरपंखी कुंतलात मन वेडे गुंतत जाई
कासावीस होऊन जीव शरण तुलाच येई

सांगशी कधी तू मज गुपित भावनांचे
का सहावे सदा पापण्यांनी भार आसवांचे

अलवार बोल सखे व्हायचा हा स्वप्नभंग
अलगद उडून जाती फुलावरी जसा पतंग

संभ्रमात मन माझे वेचिते अनंत रंग
जाणशी कधी प्रिये हृदयातील जलतरंग

तुजविण व्यर्थ आहे जगणे या जीवा
ठेवशी जपून का अपुल्या प्रीतीचा ठेवा

Friday, November 12, 2010

प्रेम



प्रेम आहे माझ्यावर
हे कधी बोलत नाही
दुसऱ्या मुलीशी बोललेलं
तुला चालत नाही

तुझ्या ह्या मौनाचा
अर्थ काय समजावा
प्रेमाचा रथ अपुल्या
मार्गी कधी लावावा

पाणावलेल्या डोळ्यात
नक्कीच काहीतरी दडलंय
मनात इकडे माझ्या
प्रीतीचं पाखरू फुलतंय

तुझ्या डोळ्यांची भाषा
मजला कळत नाही
प्रेम करतेस माझ्यावर
हे मला वळत नाही

Tuesday, November 2, 2010

दिवाळी













सौजन्य:holidaywallpapers.blogspot.com

अजि सोनियाचा दीनु
वर्षे अमृताचा घनु ............!!

वरद हा दैवाचा
ऋतू मांगल्याचा
क्षण पावित्र्याचा
सण दिवाळीचा !!

संपूर्ण रसिकांना दिवाळीच्या पोट भरून शुभेच्छा.
हीच नव्हे तर येणारी प्रत्येक दिवाळी तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येवो,अशीच परमेश्वरचरणी इच्छा........















Monday, November 1, 2010

प्रणय


रात आली पुनवेची
चंद्र होता जवळ
ओठ तिचे थरथरले
इच्छा माझी प्रबळ

मोरपंखी स्पर्श
तिच्या कुंतलांचा
चहूकडे दरवळे
हर्ष या मनाचा

गार गार हवेत
ती माझ्या कवेत
कंप तिच्या शरीराचा
बहर आला यौवनाचा

अविरत भावना
अन खट्याळ मन
दाटलेला कंठ माझा
मखमली तिचे तन

अर्धोन्मिलीत नेत्र
उचंबळत्या लाटा
अनिमिष अंगाने मग
एकत्रित आल्या वाटा

क्षितिजावरती चैतन्याचा
नवा मार्ग खुलला
मिलनाने जीवनी अपुल्या
जणु मोगरा फुलला........................



Sunday, October 31, 2010

माझा एक प्रांजळ प्रश्न????


आज लिहिण्याची इच्छा होती पण विषय नव्हता.मग बघावं साठवणीतून आठवणी भेटतात का?एक परवाचाच विषय स्मरणात आला.विषय असा......
भारत संचार निगम लि.च्या वतीने दिवाळीनिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोफत ऑनलाईन सुविधा देण्यात आली.ही सुविधा पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्या गोवा शाखेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

त्या संबंधी एका मुलीने मला फोन केला.
"सर मी BSNL मधनं बोलते आहे ,जर तुमच्याजवळ थोडा वेळ असेल तर मी बोलू शकते?"
बोला.
"सर आमच्याकडे दिवाळीनिमित्त एक ऑफर आहे"
कश्याबद्दल.{मी थोडे कष्ट घेऊनच बोलत होतो.}
"एक नवीन गेमिंग झोन आलाय एकदम फ्री"
एकदम फ्री.
"हो पण एक महिन्यासाठी".
त्यानंतर.
"आपल्याला सबक्रीप्शन वाढवून घ्यावे लागेल,त्याचे चार्जेस वेगळे लागतील."
नको नको.ह्या फालतू भानगडी नको.
"सर ऐकून तर घ्या.अपलोड करा आणि मग एक महिन्याआधी रद्द करा ना."
तीच कामं आहेत का?
"सर प्लीज ट्राय तर करा."प्लीज........
"हवं तर उद्या रद्द करा पण.........

हे साधारण पाच मि.चे बोलणे.पण त्या पाच मिनिटांच्या बोलण्यानेच मी भाळून गेलो.तिचा प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि नाही म्हणता म्हणता मी गेमिंग झोन अपलोड करायला राजी झालो.

तिचा आवाज इतका गोड होता की तिला ऐकतच राहावे.मग गेमिंग झोन अपलोड करण्याची प्रोसेस सुरू झाली.
"सर पहिले BSNL ची वेबसाईट ओपन करा."
एक मि.तू मला हे सर म्हणणं आधी थांबव.
"ओके सर."
अरे पुन्हा.......
"नाही नाही सॉरी."
आत्ता बोल.साधारण किती वेळ लागेल याला.
"तुमच्या नेट स्पीड वर अवलंबून आहे."
तरी.
"कुठे कुठे पंधरा मि.तर कुठे एक तास सुद्धा लागतो."
अरे व्वा मला एक तासच हवा होता.{मि मनात म्हटले.}
मग अपलोडिंग करता करता इकडचे-तिकडचे प्रश्न मी तिला विचारू लागलो आणि तीसुद्धा छान रित्या{प्रेमाने}
त्यांची उत्तरे देत होती.
बोलता बोलता लक्षात आलं.......अर्रे आपण तर इचे नाव विचारलेच नाही.

तुझं नाव काय गं?मी म्हणालो.
"अदा."
तुम्ही कधी खरं बोलला का?
"नाही रे खर्रच."
आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असं नाव ठेवतात का?
"मी मुस्लीम आहे."
काय?
"हो त्यात नवल काय?"
नाही नवल नाही काही.पण इतकं सुंदर मराठी कसं काय बोलतेस?
"मी चिपळूणची...............जन्मापासून"
अच्छा.म्हणजे तू खरी कोंकणी तर..........
"होय."
मग गोव्यात?
"अरे शिक्षण चालु आहे आणि पार्ट टाईम जॉब."
"झालाय का अपलोड?"तिने अचानक विचारलं.
मी एकदम थबकलो.नाही थोडं व्हायचंय.का तुला घाई आहे का?
"मला कसली घाई?माझा जॉबच आहे तो."
मग कितीही वेळ बोललं तर चालतं का?
"हो पैसे BSNL चं देतो ना!"
असं संभाषण कमीत कमी मी पाऊण ते एक तास चालवलं......................
तिच्याशी बोलणं सोडण्याची infact तोडण्याची इछाच नव्हती.
माहीत नाही का बरं?पण कदाचित मी तिच्या बोलण्याच्या प्रेमात पडलो होतो.
खूप सुंदर बोलायची ती.
मग नकळत मी तिला म्हणालो.झालं अपलोड आत्ता काय?
"आत्ता काही नाही एन्जोय......."
"आणि जर तुम्हाला सबक्रीप्शन रद्द करायचं असेल तर आमचा टोल फ्री नं.दिला आहे,त्यावर फोन करायचा."
फोन केल्यावर तूच भेटशील ना?
माझा एक प्रांजळ प्रश्न.
"नाही रे.इथे भरपूर एम्पलोइज आहेत.कोणीही भेटू शकतं."बाय......य्य्य्यय्य्य्य.........
तिचं मिश्कील उत्तर.......................

Thursday, October 28, 2010

नंदिनी............एक गोंडस फुल


ssssss...........चल उठ,

बघ सकाळ झाली,सूर्य डोक्यावर येतोय.

अगं उठ ना............

अभि,झोपु दे ना.............फक्त पाच मि.

तुझी पाच मि.माहित आहे मला.दोन तासांनी उठशील तु.

ते काही नाही चल उठ.

असा रे काय करतोस,

अगं आज दिवाळी आहे नंदू.........

ते मला माहित नाही,

आज आपण सुटीवर आहोत बस्स,

आणि मला झोपायचं आहे.

तु अशी काही ऐकायची नाही,थांब............

ए नको, अभि नको, मी उठतेय,

भिषेक.....sssssssss...............

नालायाका पाणी किती गार होतं!

निदान गरम तरी आणायचं.

उठ ना जानू आज दिवाळीचा पहिला दिवस आहे.

उद्या झोपून राहा.

आपण जर आपल्या घरी,आपल्या देशात असतो

तर आईने मारून उठवलं असतं.

ए हो............ओsssss.........ओssssss कित्ती मजा यायची.

सकाळी आई लवकर उठवायची,

अं..sssssss.......... अंघोळ आणि मग औक्षण वगैरे............

आणि नवीन कपडे.

हो तुझा तो नेहमीचा बावळट ड्रेस,

एकच एक शेरवानी...........

तेव्हा मला बाबांचंच ऐकायला लागायचं......

ते म्हणतील तेच व्हायचं.

....................आणि आत्ता मी म्हणील ते!

पण तु त्या शेरवानीमध्ये खरंच बावळट दिसायचास.

तु मात्र तेव्हा सलवार सूटमध्ये फार सुंदर दिसायची,

आणि आजही दिसतेस.

अं..ssssss.........

पुरे........ पुरे.सकाळी सकाळी जरा जास्तच रोमांटीक होतोय.

चल मला फ्रेश होऊ दे.

खूप कामं पडलीय.

आज तुझी ती मिस.मेरी येणार नाही,

सगळी कामं तुलाच करायची आहेत.............

नालायक लाज नाही वाटत मला कामं सांगायला?

त्यात लाज वाटण्यासारखं काय एवढं?

मी अंघोळीला जाते तोवर झाडांना पाणी घाल.

sss मी येऊ का..............?

हट चावट कुठला.......

नंदिनी..............नंदिनी..............नंदू.............

हो हो आले.......थांब.

अगं मिसेस केल्विन आली आहे.लवकर ये.

हो हो आले.................कुठे आहे मिसेस केल्विन?

कुठे आहे?

तेच तर मी विचारतेय...........

अं ह...........ती आलीच नाही.

मला तुझं न्हाऊन निघालेलं रूप बघायचं होतं.

पाण्याच्या थेम्बाने न्हाऊन निघालेला चेहरा पाणावलेल्या पापण्या आणि .........

बस्स ...............पुरे .

हलकट मी कित्ती घाईघाईत आली.

कंडीशनरसुद्धा लावलं नाही.

ठीक आहे ना ,रागावातेस कशाला?

चल मी लाऊन देतो.

भलत्याच वेळेस मस्करी नको.

चल ना ..........

ए सोड.

अं sssssssss...................................

आता झालं...................... भेटलं जे हवं होतं.जाऊ दे

नाही नं.........

आता तु मार खाशील.

लवकर तयार हो.आपल्याला बाजारात जायचंय.

शहाणपणा करू नको.एवढी भाजी तर पडलीय घरात...........

तुला सकाळी सकाळी ड्रायव्हिंगचा मूड आहे ते सांग?

अगदी बरोबर !

मस्त वातावरण आहे,माझी कार वाऱ्याशी बोलेले आज ...........

हो........ओsssss................ओssssssss.

आणि माझे हात तुझ्या गालाशी.

काय ?

काही नाही चल.पण तु नीट कार चालव.

वृम वृम..................वृम.........................................

नंदू कार स्लो घे,पुढे लक्ष दे,ब्रेकवर कायम पाय ठेव,

स्लो घे,स्लो म्हणतोय ना.............

ए चुप्प...........

उतर आत्ताच्या आत्ता.

दोन मि.शांत नाही राहू शकत........?

सारखी बडबड करतोय.

अगं पण तु...........

तु नाही आणि मी नाही,यायचं असेल तर शांत बस.

ठीक आहे....ए sss......एsss...........चल लवकर.

मला घरी पोहचल्यावर उद्याच्या प्रेझेनटेशन ची तयारी

करायची आहे,नाहीतर तो रॉडीक खाऊन टाकेल मला...............

काय सारखा घाबरतोस त्या रेड्याला ?

सांगून टाक नाही देणार प्रेझेनटेशन .........

व्वा.....आणि मी घरी बसू.

हो.मिस मेरी आहे की तुझ्या सोबतीला,

आणि मी कामावर असताना हरकत काय?

मार्केट आलंय,त्या पलीकडे पार्क कर

आणि फुकटची बडबड बंद कर.

अगं सरळ कुठ जातेय..............?

आपण मार्केट नंतर येताना करणार आहोत,

पहिले आपण गोर्डन हिल्स वरनं एक लाँग...............

नंदू तु पागल झाली आहे........

गोर्डन हिल्सवर बर्रीकेड नाहीत.....

हो .......हो माहित आहे मला .......मी हळू नेते.

नंदिनी कुठल्याही एका साइडने घे कार.

रस्त्याच्या मधोमध नको.

बघ बघ सांभाळ समोरून कार येतेय.......

कित्ती घाबरट आहेस तु !

ये जरा जवळ सरकून बस...........ये ना ...........

फालतू चाले करू नकोस....समोर लक्ष दे.

अगं तो मुलगा................

किती छान आहे ना ...........मी थोडी वेगाने घेते.

नंदू स्पीड कमी कर.

थांब ना ,बघ छान हवा वाहतेय.

समोर टर्निंग आहे......स्लो कर.

बघ ती कार..

अरे अभि अचानक ब्रेक लागत नाहीया......

नंदिनी गंमत पुरे.समोर स्कूल बस आहे.

नाही रे खरंच स्पीड कमी होत नाही...........

नंदू स्पीड कमी कर............समोर ते मुलं..........

स्टेअरिंग तिकडे फिरव.......

अगं डावीकडे......

ब्रेक पूर्ण कसून दाब.........

नंदिनी.......

अभि.............. नाही होत आहे.........

नंदिनी ते मुलं...........

नंदिनी ...........

अभि.............अभि...........

नंदिनी....................नं...............दि.................

नंदिनी .....ईssss.......ईsss.............ईssss..............????

नंदिनी.

माझं गोंडस फुल.माझ्यापेक्षा पाच महिन्यांनी मोठी पण पाच वर्षांनी लहान वाटते आणि वागतेसुद्धा.नेहमी हसणारी आणि हसवणारी.खोडकर,तापट पण खूप प्रेम करणारी,माझी पत्नी नंदिनी.

नंदू {मी तिला लाडाने नंदू म्हणायचो}आणि मी,लहानपणापासूनचे सोबती.तेव्हापासूनच माझ्या मनात तिच्याप्रती ओढ असायची.एक वेगळाच बंध निर्माण झाला होता.दहावीपर्यंत आम्ही शेजारी-शेजारीच होतो.मग स्वत:च्या घरी राहायला गेलो,त्यामुळे ती जवळीक तुटली.पण फोनवर बोलणे आणि बाहेर भेटणे व्हायचेच कारण आमचा फ्रेंडग्रुप एकचं होता.ते एकमेकांच्या नावाने आम्हाला चिडवायचे सुद्धा,पण तिच्या मनाने अजून मला साद नव्हती दिली आणि माझे मन तर तिच्यामध्ये आकंठ बुडाले होते.मीच कधी विचारले नाही तर ती तरी होकार कसा दर्शवणार.

आमचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आणि ती विज्ञान शाखेची.तिला शिकण्याची खूप आवड.जीवनामध्ये काहीतरी नवीन करण्याची तिची सतत धडपड.त्याच धुंदीत ती अमेरिकेला गेली,उच्च शिक्षणासाठी.जाताना मला बोलूनही गेली पण तरीही अबोल.निघून गेली ती दोन वर्षासाठी दूर साता समुद्रापार.

मी इकडे तिच्यावाचून एकटा.अस्वस्थ,बेचैन.फक्त एकच इच्छा तिला पाहण्याची,भेटण्याची.तसं नेटवर बोलणे व्हायचे अधून-मधून.तरीही तिची जवळीक काही वेगळीच.पाहता पाहता तीन महिने निघून गेले.ती तिच्या कॉलेजमध्ये रमली पण माझं इकडे काही मन लागेना.शेवटी ठरवलं जायचं अमेरिकेला.TOFFEL चं कोचिंग चालू केलं.दोन अटेम्त वाया गेले.पण तिसऱ्या मध्ये सुदैवाने निघालो.मुलगा शिकण्यासाठी एवढे पराक्रम करतोय हे बघून घरच्यांनी कशीबशी पैशांची जुळवाजुळव केली आणि मी "MASTER IN ACCOUNTING MANAGEMENT”च्या कोर्स साठी एकदाचे अमेरिकन विद्यापीठ गाठले.

अठरा तासांच्या दीर्घ प्रवासानंतर शेवटी आमचं विमान अमेरिकन विमानतळावर उतरलं.सगळ्या कागदोपत्री विधी आटोपून आम्ही म्हणजे माझ्यासोबत आणखी दोघेजण होते,बाहेर आलो.

अमेरिका खरचं स्वप्नातील देश.सगळ्या अत्त्याधुनिक सुखसोई,गगनचुंबी इमारती,विशाल रस्ते हे सगळं बघून मी तर हरपून गेलो.थोड्याच वेळात आमच्या कॉलेजची गाडी आम्हाला न्यायला आली.साधारण दोन-अडीच तासानंतर आम्ही होस्टेलवर पोहोचलो.रूमची व्यवस्था ठीक होती.कॉलेज सुरु व्हायला तीन दिवस शिल्लक होते.या वेळात लवकरात लवकर नंदूला भेटून घ्यावे अशी इच्छा होती.

मी फ्रेश झालो.थोडा आराम आणि खाणं-पिणं झाल्यावर जवळच्या नेट कॅफेवर गेलो आणि नंदूला स्क्राप करून तिचा सेल नं.मागितला.मग होस्टेलला परत येऊन आम्ही तेथील सुव्यवस्थेचा आढावा घेतला.लवकरच तेथे आमचे दोन-तीन मित्र जमले.सगळं काही एका स्वप्नासारखं वाटत होतं.स्वदेश ते विदेश माझ्यासाठी इतकं लवकर घडलं की मुंबई-पुणे म्हणण्याइतकं,पण प्रत्यक्षात मात्र फार कठीण.ती TOFFEL ची तयारी आणि परीक्षा देता देता तर माझ्या नाकी नऊ आले होते.अश्याच काही आंबट-गोड आठवणीमध्ये गुंतत मी झोपी गेलो.

अमेरिकेची सुंदर पहाट आणि त्यात मला नंदूच्या सेल नं ची वाट.माझ्याच रुममध्ये असणाऱ्या स्टिफनच्या लैपटोपवर मी माझा मेल चेक केला.नंदुनी सेल नं.पाठविला होता आणि सोबत लिहिले होते की "नं.तर असा मागतो आहे की आत्ता ISD CALL करणार आहे."तिला मी इथे येण्याबाबद काहीच माहिती नव्हते.

मी लगेच तिला तिथल्या PCO तून फोन केला,माझा आवाज तिथल्या लोकल नं,वरून ऐकून तिचा तर विश्वासच बसेना.खूप काही बोलल्यानंतर मी तिला भेटण्यासाठी बोलावले.ते त्या दिवशी शक्य नव्हते कारण तिच्या ठिकाणापासून माझे होस्टेल फार दूर होते.आम्ही दुसऱ्या दिवशी भेटण्याचे ठरविले.त्या रात्री मला झोपच लागली नाही.माझे मन तिला भेटण्यासाठी आतुर झाले होते.जवळ-जवळ एक-दीड वर्षानंतर आम्ही भेटणार होतो.मला तिथलं काहीच माहिती नसल्यामुळे माझ्या कॉलेज जवळच भेटायचं ठरलं होतं.मी तिथे आधीपासूनच हजर होतो.दीड तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ती आली.हळूहळू,मंद गतीने चालत माझ्या जवळ आली आणि पटकन तिने मला मिठीत घेतले.एका संथ पण ज्वलंत कृतीने मी भारावून गेलो.मला तर गहिवरल्या सारखे झाले.तोंडातन शब्दच फुटेना.कित्ती कित्ती दिवसांनी आम्ही भेटलो होतो.

किती दिवसापासून मी तुझी वाट बघतेय आणि तु आज येतोय,ती म्हणाली.

तिच्या या वाक्याने मी थबकून गेलो.

पण तु तर कधी बोलली नाहीस,मी म्हणालो.

प्रेम हे बोलण्यातूनच प्रकट व्हायला हवं का?

लहानपणापासूनच माझं प्रेम होतं तुझ्यावर पण वाटलं तु कधीतरी बोलशील.

आणि मी जर इथे आलो नसतो तर...........

मी तर येणारच होते ना !

झालं शेवटी जे व्हायचं.आम्ही एकत्र आलो.

तिला तिथेच एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि विसा ही वाढवून मिळाला.

मग आम्ही काही दिवसांसाठी अमेरिकेतच वास्तव्यास होतो....................


त्या जीवघेण्या अपघाताने माझ्या आयुष्याची माती झाली. होतं नव्हतं सगळं गमावून बसलो.आज तिच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी पुन्हा ते सारे क्षण जागे झाले जे मी आजवर मनात मारून ठेवले होते.मी गमावून बसलो नंदूला आणि आमच्या फुलाला.

तीन महिन्यांची गरोदर होती ती .......................