कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Monday, October 25, 2010

स्मरण


रम्य ही पहाट
फुललेली रानवट
तुझे झाले स्मरण
स्थिरावले सारे क्षण
मग हरपून भान
मन झाले गं उधाण.........
रूप गोजिरे सोनेरी
कुरवाळ सांभाळून
प्रतिबिंब देखणे
निहारतो दर्पण.............
सूर्याचे किरण
छेडी गवाक्षातून
दैवाची नवलाई
दिसे तुझ्या रूपातून................
गुलाबी लज्जा ही
थिजे नाजूक मुखावर
जशी सरिता वाहते
समावाण्या सरोवर.............
साधे वागणे असे
जणू वासरू गाईचं
प्रेम ओथंबून वाहते
ओठांतील शब्दातून ...........

No comments:

Post a Comment