कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....

Monday, October 25, 2010

विरह


तू गेली मला सोडून ढगांत
दैवाचे भाग्य आहे
विरह आला नशीबी
हे माझे दुर्भाग्य आहे

तुझी सावली घरात राहावी
म्हणून दिवा तेवत ठेवला आहे
साथ देत एका हुंदक्याची
काळीज माझं जळत आहे

साद घालता तुला कधी
नजर पडते दिव्यावरती
आठवणीच्या अंधारात मग
सांज बुडते क्षितिजावरती

तुझ्या दिव्याच्या उजेडात
आकाशाला जाग आली
रात्रभर जागून माझ्या डोळ्यांत
रात्रीलाही आता झोप आली

No comments:

Post a Comment