खचलो मी,संपलो मी
शेवटचा श्वास घेतला
मृत्युशय्येत झोकुन स्वत:ला
शरीराने हा साथ सोडला................
निघाली मिरवणूक माझ्या प्रेताची
फुलं,पाकळ्या उधळीत होत्या
अश्रुंच्या जागी डोळ्यांत त्यांच्या
आनंद जणु ओसंडत होता................
हाताचे खांदे अनेक होते
साथ देणारा हात नव्हता
तुटली सारी नाती-गोती
ते जपणारा बंध नव्हता...............
रामनाम तेच होते आज
अर्थ मात्र वेगळा होता
ज्या लोकांसि भेटण्या झुरलो
अंती समुदाय तो सगळा होता..................
येता जवळ स्मशान भूमि
पाय माझे थरथरले
पेटविता शव माझे
मन मुक्तांगाने बहरले..................
अंत आहे येता मरण
जाण असते प्रत्येक जीवा
ओढ कशी ही जीवनाची
पुन्हा नव्याने जन्म हवा..................
कधी काहीही न बोलता बोलावेसे वाटते, चाल तीच ठेऊन शब्द बदलावेसे वाटते, शब्दांचे घेर घेरतात मग चौफेर, नि:शब्द होऊन गगनात उडावेसे वाटते.....
Monday, October 25, 2010
निरोप
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment